पिंपरी चिंचवड दि.३०-:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) शासकीय रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) केवळ ६ खाटांवर चालत आहे, ही बाब धक्कादायक असून शहरातील लहान बालकांच्या आरोग्याशी सरळसरळ उघड खिलवाड सुरू आहे.
फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, ताप, इन्फेक्शन्स अशा गंभीर बालरोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, सुविधा नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि मुलांचे जीव धोक्यात येतात. याकडे दुर्लक्ष होणे हे प्रशासन व जनप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे.
---
🌐 जनतेचे प्रश्न – नेत्यांचे मौन!
पिंपरी चिंचवड शहरात दोन आमदार असूनही वायसीएमसारख्या शासकीय रुग्णालयात बालरुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे सामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. दररोज हजारो रुग्ण सरकारी रुग्णालयात येतात, पण बालरोग विभागात जागा नसल्यामुळे अनेकांना खासगी रुग्णालयात जावे लागते – जे सामान्य, वंचित व अनुसूचित समाजाच्या कुटुंबांना परवडत नाही.
---
📣 सुनिल कांबळे यांची प्रतिक्रिया व ठाम भूमिका
सुनिल कांबळे
(सचिव – सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट – पिंपरी चिंचवड)
यांनी या प्रश्नावर जोरदार प्रतिक्रिया दिली:
"आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. वायसीएममध्ये फक्त ६ बेड्सचा बालरोग विभाग चालू आहे हे पिंपरी चिंचवड शहरावरचं काळं ठिपकं आहे. शहरात दोन आमदार असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. मी आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेबांना मेल व पत्राद्वारे विनंती केली आहे की त्यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी आणि आकुर्डी, थेरगाव, तालेरा रुग्णालयांमध्येही बालरोग विभाग सुरु करून वायसीएमवरील ताण हलवावा."
---
📌 त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
1) वायसीएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात खाटांची संख्या किमान ३०–५० पर्यंत तातडीने वाढवावी.
2) आकुर्डी, थेरगाव व तालेरा उपमहापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बालरोग विभाग कार्यान्वित करावेत.
3) बालरोग तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सेस, व्हेंटिलेटर्स, आवश्यक औषधे उपलब्ध करावीत.
4) गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोफत उपचार योजना लागू करावी.
5) शहरातील दोन्ही आमदारांनी याबाबत सक्रिय भूमिका घेत शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करावा.
---
🔍 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची परीक्षा
कोविडनंतर लहान मुलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यासाठी सक्षम व तातडीची उपचारव्यवस्था आवश्यक आहे. अन्यथा हे केवळ वैद्यकीय दुर्लक्ष न राहता मानवी हक्कांचे उल्लंघन ठरू शकते.
---
📩 राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांना याबाबत अधिकृत मेल व पत्र पाठवण्यात आले असून, वायसीएममधील अपुऱ्या सुविधा, तसेच आकुर्डी-थेरगाव-तालेरा येथील उपमहापालिका रुग्णालयांत बालरोग विभाग सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या मेलद्वारे स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की – लहान मुलांचे जीव वाचवण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत.
---
⚠️ आंदोलनाचा इशारा
"लहान मुलांचे प्राण वाचवणे ही प्राथमिकता असावी. जर प्रशासनाने लवकरच उपाययोजना न केल्यास, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल" – असा इशारा सुनिल कांबळे यांनी दिला आहे.


0 Comments