• पाच व सहा जून रोजी रायगडावर उपस्थित रहा: संभाजी ब्रिगेडचे आवाहन.
पिंपरी चिंचवड -: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बहुजनांची अस्मिता राज्यासह देशाचा स्वाभिमान रयतेचा अभिमान. या राजांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात उपस्थिती दर्शवून अभिवादन करू या सोहळ्यातून त्यांच्या ऐतिहासिक सत्याचा जागर सर्वसामान्यांच्या मनामनात रुजवू असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांना या सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन करून त्यांच्या जाज्वल्य इतिहासाला सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. बहुजनांमध्ये त्यांच्या कार्याची प्रचिती तेवत ठेवायला हवी. रयतेसाठी त्यांनी दिलेला लढा याचा प्रत्येकानेच अभिमान बाळगायला हवा काही दुषित मनाच्या व्यक्ती शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या विद्रुप मनवृत्तीला छेद देण्यासाठी रायगडाच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन काळे यांनी केले.





0 Comments